चिन्ता दहति जीवितम्...
(अँक्झाईटी व पॅनिक डिसॉर्डर )
अनन्य.. थर्ड मेजर 'एमबीबीएस'चा विद्यार्थी.. आज त्याची सर्जरी विषयाची प्रात्यक्षिक परिक्षा आहे. कालपासून रात्रभर जागून अभ्यास करून अनन्य परिक्षेला आला. सर्जरीची परिक्षा म्हणजे खायचं काम नव्हे. विद्यार्थी कितीही हुशार असला, तरी सर्जरीच्या नावाने पोटात गोळा येतो. अनन्यही आज अस्वस्थ होता; पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. अनन्यच्या छातीत सारखी धडधड होत होती. मधूनंच दरदरून घाम फुटत होता. हातपाय सारखे लटलट कापत होते. रात्री खरंतर त्याचे थोडावेळ झोपण्याचाही प्रयत्न केला होता; पण झोपंही आली नव्हती. परिक्षेत आपल्याला कमी गुण मिळतील, याहीपेक्षा आपल्याला काहीही येणार नाही आणि सगळे शिक्षक, रुग्ण आणि विशेषतः 'तिच्या'समोर आपलं फार हसू होईल, सगळे खिल्ली उडवतील अशी प्रचंड भिती अनन्यला वाटत होती. अखेरीस अनन्यच्या डोळ्यासमोर अंधारी आली, छातीत फार धडधड होऊन त्याला आता धाप लागली आपण घुसमटतो की काय अशी भिती त्याला वाटून चक्क सगळ्यांची नजर चुकवून परिक्षाकेंद्रातून बाहेर आला आणि लांब पळत सुटला. धावत-धडपडत स्वतःच्या खोलीत आला आणि बिछान्यावर स्वत:ला झोकून देऊन डोक्यावर उशी दाबून ओक्साबोक्शी रडू लागला.
वास्तविक त्याच्या बाबतीत असं होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. परिक्षेचं जाऊ दे, गेल्या कित्येक महिन्यात अनन्यने कोणतीही गोष्ट मनापासून एन्जॉय केली नव्हती. सारखी एखादी अनामिक भिती त्याला लागून राहिलेली असे. गर्दीच्या ठिकाणी गेला म्हणजे 'लोकांना आपल्याबद्दल काय वाटते' याची तो सारखी चिंता करत असे. बरेचदा लोकांवर आपलं इम्प्रेशन पडावं म्हणून मुद्दाम मोठ्या आवाजात बोलणे, एखादा विनोद करून प्रतिक्रियांसाठी लोकांचे चेहरे न्याहाळणे असं तो वागत असे. काही चुकल्यासारखं वाटलं म्हणजे प्रचंड गोंधळून जात असे. एकटा असला म्हणजे नको नको ते वाईट विचार त्याच्या मनात येत. आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार याची चिंता त्याला लागून राहात असे. रात्री झोपेतून अचानक जाग येणं, छातीत धडधडणं, हातपाय कापणं असं अनन्यसोबत अनेकदा घडत असे. वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी असल्याने आपल्यासोबत काय घडतंय याची अनन्यला अजिबातंच कल्पना नव्हती असं नव्हतं. ही 'अँक्झाईटी डिसॉर्डर' अर्थात 'चिंताविकारग्रस्तते'ची लक्षणं होती; पण ही गोष्ट इतरांसमोर मान्य करायला, उपचार घ्यायला अनन्य घाबरत होता. त्यातंही पुन्हा 'लोकांना काय वाटेल' हीच भिती त्याला सतावत होती.
'चिता दहति निर्जीवं चिन्ता दहति जीवितम् ।' असं एक संस्कृत वचन आहे. चिता निर्जीव(मृत) व्यतीला जाळते, तर चिंता जिवंत व्यक्तीला जाळते, असा त्याचा अर्थ ! मानवी मेंदू उत्क्रांत होताना, त्यासोबत अर्थातंच मानवी भावनांचाही विकास झाला. स्वत:च्या जिविताबाबतची चिंता-भिती यामुळे खरंतर रानावनात राहता राहता सुरक्षेचे नवे उपाय योजू लागला आणि रानटी जीवन सोडून जगू लागला. उद्या परिक्षा आहे, आपण नापास होऊ किंवा कमी गुण मिळतील ही भिती-चिंता आपल्याला खरंतर सकारात्मक काम करण्यासाठी उद्युक्त करत असते; पण एका मर्यादेपेक्षा अधिक चिंता जी दैनंदिन जीवनावर परिणाम करते तो मात्र एक 'विकार' मानून त्यावर उपचारांची गरज असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 'इंटरनॅशनल क्लासिफिकेशन अॉफ डिसीज' (ICD-10) नुसार अँक्झाईटी डिसॉर्डर्सचे 'F41' असे वर्गीकरण केले जाते. चिंता ही तात्पुरती, कायमस्वरूपी, ठराविक काळाने परतपरत उद्भवणारी असू शकते. एखाद्या गोष्टीची अति भिती वाटणे, सतत आपल्यावर एखादे संकट ओढवेल असे वाटणे, चिडचिड होणे, एकाग्रता कमी होणे,सदासर्वदा काल्पनिक विश्वात रमणे अशी अँक्झाईटीची विविध मानसिक लक्षणे विविध टप्प्यांवर दिसतात. छातीत धडधडणे, सारखे लघवी किंवा संडासला जावेसे वाटणे, कायम थकवा जाणवणे, सतत आळस किंवा निद्रानाश, दरदरून घाम येणे, दम लागणे, डोकेदुखी, छातीत दुखणे, हातपाय थरथरणे अशी शारिरीक लक्षणे दिसतात.
दैनंदिन जीवनातील ताण, स्पर्धात्मक वृत्ती, कामाची अनियमित वेळ यामुळे चिंताग्रस्ततेचे वाढते प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. सतत तणावपूर्ण वातावरण, भिती हे जनरालाईज्ड अँक्झाईटी डिसॉर्डरला कारणीभूत ठरतात. लहानपणी पालकांच्या अति धाकाखाली राहिलेली मुलं मोठेपणी अँक्झाईटी डिसॉर्डरला बळी पडू शकतात. जगात दर तेरा माणसांमागे एका माणसाला अँक्झाईटी डिसॉर्डर असतो. आशियामध्ये हे प्रमाण ६% आहे.थायरॉईड हॉर्मोन्सची रक्तातली पातळी वाढणे, फिओक्रोमोसायटोमा, व्यसनाधीनता किंवा दारू अथवा झोपेची औषधे अचानक बंद करणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, हृदयाच्या गतीचे आजार (अरिदमिया) इ. आजारांमुळे अँक्झाईटीचे प्रमाण वाढू शकते.
एखाद्या गोष्टीबद्दलची सततची भिती, तणाव चिंताग्रस्ततेकडे वाटचाल करू लागतो. अति चिंताग्रस्तता कधी 'पॅनिक अटॅक्स'ना कारणीभूत ठरते. साधारण ४.७% लोकांना पॅनिक डिसॉर्डर हा विकार असतो. वरील उदाहरणात जे अनन्यसोबत घडलं ती लक्षणं पॅनिक अटॅक्समध्ये आणखी तीव्रतेनेही दिसू शकतात. पॅनिक अटॅक्स आल्यावर आपली चिंता आणि भिती यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकावं लागतं. औषधांचा त्यावर फारसा उपयोग होत नसल्याने कॉग्निटीव्ह बिहेविअरल थेरपी (सी.बी.टी.) हा एक उपचार उपलब्ध आहे. रुग्णांना रिलॅक्सेशनचं तंत्र शिकावावं लागतं. आपल्या समस्येविषयी समुपदेशकाशी बोलणं याला 'टॉक थेरपी' असं म्हणतात. योगासन, ध्यान, प्राणायाम याचाही अशा विकारांवर उपयोग होतो.
मेंदूतील गॅमा अमायनो ब्युटरिक अॅसिड (GABA) या रसायनाची पातळी कमी झाल्यास चिंताग्रस्तता, नैराश्य येऊ शकतं. 'गाबा' रसायनांची पातळी वाढवणारी औषधं या विकारांमध्ये देता येतात. आता अनेक नवीन गटांतील औषधेही या विकारांवरील उपायासाठी उपलब्ध आहेत.
पण या सगळ्या उपायांपेक्षाही आपल्या समस्यांविषयी पुढे येऊन जवळच्या व्यक्तींशी बोलणं आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्यांच्या समस्येतून बाहेर यायला मदत करणं अधिक महत्वाचं असतं. चिंता किंवा नैराश्यग्रस्त व्यक्तींना तुमच्या सहानुभूतीची गरज नसते, गरज असते, ती 'हो, तू यावर मात करू शकतो !' हा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्याची !
डॉ. सागर पाध्ये
(अँक्झाईटी व पॅनिक डिसॉर्डर )
अनन्य.. थर्ड मेजर 'एमबीबीएस'चा विद्यार्थी.. आज त्याची सर्जरी विषयाची प्रात्यक्षिक परिक्षा आहे. कालपासून रात्रभर जागून अभ्यास करून अनन्य परिक्षेला आला. सर्जरीची परिक्षा म्हणजे खायचं काम नव्हे. विद्यार्थी कितीही हुशार असला, तरी सर्जरीच्या नावाने पोटात गोळा येतो. अनन्यही आज अस्वस्थ होता; पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. अनन्यच्या छातीत सारखी धडधड होत होती. मधूनंच दरदरून घाम फुटत होता. हातपाय सारखे लटलट कापत होते. रात्री खरंतर त्याचे थोडावेळ झोपण्याचाही प्रयत्न केला होता; पण झोपंही आली नव्हती. परिक्षेत आपल्याला कमी गुण मिळतील, याहीपेक्षा आपल्याला काहीही येणार नाही आणि सगळे शिक्षक, रुग्ण आणि विशेषतः 'तिच्या'समोर आपलं फार हसू होईल, सगळे खिल्ली उडवतील अशी प्रचंड भिती अनन्यला वाटत होती. अखेरीस अनन्यच्या डोळ्यासमोर अंधारी आली, छातीत फार धडधड होऊन त्याला आता धाप लागली आपण घुसमटतो की काय अशी भिती त्याला वाटून चक्क सगळ्यांची नजर चुकवून परिक्षाकेंद्रातून बाहेर आला आणि लांब पळत सुटला. धावत-धडपडत स्वतःच्या खोलीत आला आणि बिछान्यावर स्वत:ला झोकून देऊन डोक्यावर उशी दाबून ओक्साबोक्शी रडू लागला.
वास्तविक त्याच्या बाबतीत असं होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. परिक्षेचं जाऊ दे, गेल्या कित्येक महिन्यात अनन्यने कोणतीही गोष्ट मनापासून एन्जॉय केली नव्हती. सारखी एखादी अनामिक भिती त्याला लागून राहिलेली असे. गर्दीच्या ठिकाणी गेला म्हणजे 'लोकांना आपल्याबद्दल काय वाटते' याची तो सारखी चिंता करत असे. बरेचदा लोकांवर आपलं इम्प्रेशन पडावं म्हणून मुद्दाम मोठ्या आवाजात बोलणे, एखादा विनोद करून प्रतिक्रियांसाठी लोकांचे चेहरे न्याहाळणे असं तो वागत असे. काही चुकल्यासारखं वाटलं म्हणजे प्रचंड गोंधळून जात असे. एकटा असला म्हणजे नको नको ते वाईट विचार त्याच्या मनात येत. आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार याची चिंता त्याला लागून राहात असे. रात्री झोपेतून अचानक जाग येणं, छातीत धडधडणं, हातपाय कापणं असं अनन्यसोबत अनेकदा घडत असे. वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी असल्याने आपल्यासोबत काय घडतंय याची अनन्यला अजिबातंच कल्पना नव्हती असं नव्हतं. ही 'अँक्झाईटी डिसॉर्डर' अर्थात 'चिंताविकारग्रस्तते'ची लक्षणं होती; पण ही गोष्ट इतरांसमोर मान्य करायला, उपचार घ्यायला अनन्य घाबरत होता. त्यातंही पुन्हा 'लोकांना काय वाटेल' हीच भिती त्याला सतावत होती.
'चिता दहति निर्जीवं चिन्ता दहति जीवितम् ।' असं एक संस्कृत वचन आहे. चिता निर्जीव(मृत) व्यतीला जाळते, तर चिंता जिवंत व्यक्तीला जाळते, असा त्याचा अर्थ ! मानवी मेंदू उत्क्रांत होताना, त्यासोबत अर्थातंच मानवी भावनांचाही विकास झाला. स्वत:च्या जिविताबाबतची चिंता-भिती यामुळे खरंतर रानावनात राहता राहता सुरक्षेचे नवे उपाय योजू लागला आणि रानटी जीवन सोडून जगू लागला. उद्या परिक्षा आहे, आपण नापास होऊ किंवा कमी गुण मिळतील ही भिती-चिंता आपल्याला खरंतर सकारात्मक काम करण्यासाठी उद्युक्त करत असते; पण एका मर्यादेपेक्षा अधिक चिंता जी दैनंदिन जीवनावर परिणाम करते तो मात्र एक 'विकार' मानून त्यावर उपचारांची गरज असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 'इंटरनॅशनल क्लासिफिकेशन अॉफ डिसीज' (ICD-10) नुसार अँक्झाईटी डिसॉर्डर्सचे 'F41' असे वर्गीकरण केले जाते. चिंता ही तात्पुरती, कायमस्वरूपी, ठराविक काळाने परतपरत उद्भवणारी असू शकते. एखाद्या गोष्टीची अति भिती वाटणे, सतत आपल्यावर एखादे संकट ओढवेल असे वाटणे, चिडचिड होणे, एकाग्रता कमी होणे,सदासर्वदा काल्पनिक विश्वात रमणे अशी अँक्झाईटीची विविध मानसिक लक्षणे विविध टप्प्यांवर दिसतात. छातीत धडधडणे, सारखे लघवी किंवा संडासला जावेसे वाटणे, कायम थकवा जाणवणे, सतत आळस किंवा निद्रानाश, दरदरून घाम येणे, दम लागणे, डोकेदुखी, छातीत दुखणे, हातपाय थरथरणे अशी शारिरीक लक्षणे दिसतात.
दैनंदिन जीवनातील ताण, स्पर्धात्मक वृत्ती, कामाची अनियमित वेळ यामुळे चिंताग्रस्ततेचे वाढते प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. सतत तणावपूर्ण वातावरण, भिती हे जनरालाईज्ड अँक्झाईटी डिसॉर्डरला कारणीभूत ठरतात. लहानपणी पालकांच्या अति धाकाखाली राहिलेली मुलं मोठेपणी अँक्झाईटी डिसॉर्डरला बळी पडू शकतात. जगात दर तेरा माणसांमागे एका माणसाला अँक्झाईटी डिसॉर्डर असतो. आशियामध्ये हे प्रमाण ६% आहे.थायरॉईड हॉर्मोन्सची रक्तातली पातळी वाढणे, फिओक्रोमोसायटोमा, व्यसनाधीनता किंवा दारू अथवा झोपेची औषधे अचानक बंद करणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, हृदयाच्या गतीचे आजार (अरिदमिया) इ. आजारांमुळे अँक्झाईटीचे प्रमाण वाढू शकते.
एखाद्या गोष्टीबद्दलची सततची भिती, तणाव चिंताग्रस्ततेकडे वाटचाल करू लागतो. अति चिंताग्रस्तता कधी 'पॅनिक अटॅक्स'ना कारणीभूत ठरते. साधारण ४.७% लोकांना पॅनिक डिसॉर्डर हा विकार असतो. वरील उदाहरणात जे अनन्यसोबत घडलं ती लक्षणं पॅनिक अटॅक्समध्ये आणखी तीव्रतेनेही दिसू शकतात. पॅनिक अटॅक्स आल्यावर आपली चिंता आणि भिती यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकावं लागतं. औषधांचा त्यावर फारसा उपयोग होत नसल्याने कॉग्निटीव्ह बिहेविअरल थेरपी (सी.बी.टी.) हा एक उपचार उपलब्ध आहे. रुग्णांना रिलॅक्सेशनचं तंत्र शिकावावं लागतं. आपल्या समस्येविषयी समुपदेशकाशी बोलणं याला 'टॉक थेरपी' असं म्हणतात. योगासन, ध्यान, प्राणायाम याचाही अशा विकारांवर उपयोग होतो.
मेंदूतील गॅमा अमायनो ब्युटरिक अॅसिड (GABA) या रसायनाची पातळी कमी झाल्यास चिंताग्रस्तता, नैराश्य येऊ शकतं. 'गाबा' रसायनांची पातळी वाढवणारी औषधं या विकारांमध्ये देता येतात. आता अनेक नवीन गटांतील औषधेही या विकारांवरील उपायासाठी उपलब्ध आहेत.
पण या सगळ्या उपायांपेक्षाही आपल्या समस्यांविषयी पुढे येऊन जवळच्या व्यक्तींशी बोलणं आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्यांच्या समस्येतून बाहेर यायला मदत करणं अधिक महत्वाचं असतं. चिंता किंवा नैराश्यग्रस्त व्यक्तींना तुमच्या सहानुभूतीची गरज नसते, गरज असते, ती 'हो, तू यावर मात करू शकतो !' हा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्याची !
डॉ. सागर पाध्ये

माझ्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहिल्यात आणि हे खरंय कि त्यांना अजून समजत नाही कि नक्की काय होतय.
ReplyDeleteमनोविकारतज्ञांचा एकवार सल्ला घेण्यास काहीच हरकत नाही.विशिष्ट पद्धतीने या आजारांचे निदान करता येते आणि त्यावर आवश्यक ते उपचारंही करता येतात.
Deleteजेनेटिक दोष मुळे हा दोष असेल का?
ReplyDeleteमाझे मामा आणि काका यांनी आत्महत्या केली.
तर हा स्ट्रेस cha दोष माझ्यात asu शकतो का?
मला anxiety वाटते...